‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिली म्हणून तरुणांवर गुन्हे दाखल, ठाण्यातील घटना

यावेळेस तर थेट आग्राच्या लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करुन महाराजांना एक आगळी वेगळी मानवंदना दिली गेली पण यांच वेळेस ठाण्यातील कळवा शहरात मात्र ” छत्रपती शिवाजी महाराज की जय” घोषणा दिल्या म्हणून थेट गुन्हा दाखल करण्याचा प्रताप ठाणे पोलिसांच्या कळवा पोलिसांनी केला आहे.कळव्यातील जयभीम नगर ते कळवा नाकापर्यंत तुळशीराम साळवे, भिमा साळवे या तरुणांनी काही तरुणांसह बाईक रॅली काढली होती. या रॅली दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देखील दिल्या.
पण यांच घोषणा आणि बाईक रॅली काढणे त्यांना महागात पडले कारण कळवा पोलिसांनी तुळशीराम साळवे, भिमा साळवे आणि इतरांवर गुन्हा दाखल केला. कळवा पोलिसांनी जो प्रताप केलाय त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपतींच्या राज्यात महाराजांच्या घोषणा द्यायच्या नाही तर मग तालिबान दहशतवादी जिंदाबादच्या घोषणा द्यायच्या का? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला.
कळवा पोलिसांच्या या प्रतापामुळे पोलिसांवर आता सारवासारव करण्याची नामुष्की आली आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले गेले आणि दरम्यान घोषणा दिल्या. गेल्या अशा स्वरुपाचा हा गुन्हा दाखल केला गेला. गुन्हा हा फक्त घोषणा दिल्या म्हणून नाही तर विना परवाना बाईक रॅली काढून सार्वजनिक ठिकाणी घोषणा दिल्या म्हणून गुन्हा दाखल केला गेला आहे, अशी सारवासारव पोलिसांनी केली. या विषयावर कोणीही पोलीस अधिकारी बोलायला तयार नाही.