सोलापूर बातमीक्राईममहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवर युएपीए अंतर्गत कारवाई करा…..

सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजणार असून जो- तो पक्ष आपापल्या परीने पक्षाची ताकद दाखवत असतांना काही नतद्रष्ट लोक हे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करीत आहेत.

भाजपाचे आमदार नितेश राणे हे सतत मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या भावना दुखावण्याचे काम करीत आहेत. प्रत्येक सभेत मुस्लिमांबद्दल गरळ ओकून हिंदू-मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे विखारी वक्तव्य करीत आहेत. परंतु याबाबत महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर काहीही कारवाई न केल्याने सरकारचा नितेश राणेला पाठिंबा आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढे खुलेआमपणे एका समाजाबद्दल अपशब्द वापरून, गरळ ओकून जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्रात कायदा आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारू लागलेले आहेत.

यति नरसिंहानंद व रामगिरी महाराज यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केलेले आहे. विनाकारण आणि कुठलाही वाद नसतांना प्रेषितांचे नाव घेऊन त्यांचेबद्दल अपशब्द वापरून वरील दोघांनी ते कुठल्या लायकीचे आहेत हे दाखवून दिले आहे. वरील तिन्ही लोक भडकावू भाषण करण्यासाठी प्रसिध्द असून दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य करीत असतात.

तरी माननीयांना विनंती आहे की, दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य वारंवार करून समाज भावना भडकाविण्याचे काम करणाऱ्या नितेश राणे, यति नरसिंहानंद, रामगिरी महाराज यांच्यावर ‘युएपीए’ अंतर्ग कारवाई करावी. तसेच कोणत्याही देवी-देवता व महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही पक्षान पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच धार्मिक व्यक्ती हे जर दोन समाजात तेढ निर्माण करणारे व भडकाऊ भाषण करणाऱ्या तातडीने ‘युएपीए’ कायद्याखाली तातडीने कारवाई करावी. ही विनंती

https://domainauthority.web.id/check-da-pa-bulk/

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel