महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आमदार-अभिजीत पाटील

राष्ट्रमाता जिजाऊ महिलारत्न पुरस्काराचे थाटात वितरण. डॉ.स्मिता पाटील, अमृता देशमुख ,संध्या काळे यांचा झाला सन्मान. सोलापूर प्रतिनिधी. समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्तीने महिलांचा सन्मान राखला पाहिजे. त्याची सुरुवात आपण स्वतःच्या घरापासून करणे गरजेचे आहे. मी पंढरपूरमध्ये पहिलं मल्टिप्लेक्स सिनेमा थिएटर सुरू केले. त्याचं उद्घाटन करण्याकरीता मी अनेक राजकीय मंडळींना निमंत्रित केले होते .परंतु उद्घाटन मात्र माझ्या मातोश्रीचे हस्ते केले. धाराशिव मध्ये घेतलेल्या कारखान्याचे उद्घाटनही मी आईच्याच हस्ते करून कारखान्याची सुरुवात केली होती. आपण जर आपल्याच कुटुंबातील महिलांना सन्मान द्यायला लागलो तर सर्वत्र त्यांना सन्मान मिळेल असे मत माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हीप्परगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश माने यांच्या वतीने आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ महिलारत्न पुरस्काराच्या वितरण प्रसंगी आमदार पाटील हे बोलत होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मोहोळ येथील डॉक्टर स्मिता पाटील, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या पंढरपूर येथील उपक्रमशील शिक्षिका संध्या काळे, व आपली नोकरी सांभाळून सामाजिक कार्यामध्ये ठसा उमटवणाऱ्या आरटीओ इन्स्पेक्टर अमृता देशमुख (करकंब) यांना राष्ट्रमाता जिजाऊ महिला रत्न पुरस्कार देऊन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर राजेश काळे ,पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक , सरपंच मनोज महाडिक ,बळीराम हेबळे , लक्ष्मण फडतरे, उद्योजक अभिजीत पवार बाबासाहेब माने, दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण, शंकरराव यादव, भाऊसाहेब जाधव शिवाजी निकम. यांच्यासह ग्रामस्थ सदस्य व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश माने , व मनीषा माने यांचा विशेष सत्कार आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर स्मिता पाटील म्हणाल्या की, आज समाजामध्ये प्रचंड दहशतवाद माजला आहे .चार वर्षाच्या मुलीपासून 80 वर्षाच्या म्हातारी पर्यंत कोणीही सुरक्षित राहिली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सत्कारमूर्ती आरटीओ इन्स्पेक्टर अमृता देशमुख शिक्षिका संध्या काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महेश माने म्हणाले की, प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जिजाऊ असणं गरजेचं आहे तिलाच आपण गर्भात मारत आहोत जर जिजाऊ जन्माला येणार नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्माला येतील. यावेळी मार्गदर्शन करताना मनीषा माने म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन हे सर्वोत्कृष्ट शासन होते. दोन छत्रपतीना घडविणाऱ्या जिजाऊ मासाहेब यांच्या नावाने आम्ही गेल्या सात वर्षापासून पुरस्कार देऊन कर्तुत्वान महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बिराजदार यांनी केले तर आभार मनोज महाडिक यांनी मानले. बातमीचा फोटो मेन वर पाठवला आहे.