लाखो सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करा – प्रहार जनशक्ती पक्ष व डॉ. संदीप आडके यांची मागणी

सोलापुरातील भोगाव रोडला असणान्या वायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट मधून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्याने लाखो सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ लावला आहे. याबाबत राज्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन पाठपुरावाही केला, परंतु कारवाई काहीच होत नसल्याने सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करणान्या बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टची उद्यस्तरीय चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहरप्रमुख अजितभाऊ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
१) भोगाव येथील कचरा डेपो मध्ये बायोमेडिकल वेस्ट कचरा मोठ्या प्रमाणावर सडत असून तेथे राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे, कोविड काळातील शेकडो टन कचरा हा गाडून ठेवल्यामुळे त्याचे विघटन होऊन पाण्यामध्ये मिसळण्याची दाट शक्यता आहे. याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
२) आरोग्य अधिकारी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यातून त्यांनी या ठिकाणी शेकडो टन कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नसल्याचे उपटकीला आणले आणि त्या संदर्भात वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने सदर प्रोजेक्टची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोर्षीवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रसिध्द आर्थातज्ञ डॉ. संदीप आडके यांनीही केलेली आहे. ३) बायो मेडिकल वेस्ट प्रोजेक्ट हा एस. एस. कंपनीकडे असून या प्रकल्पाला प्रदूषण मंडळाची परवानगी नाही.
तसेच महापालिका प्रशासनाने या प्रकल्पाला नोटीसही दिली होती. परंतु पुढे कार्यवाही झाली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली होती. प्रकल्पाच्या वादास्त पणाची चर्चा वाढत गेल्यानंतर येथील काही टन कचरा हा गुपचूप पद्धतीने कोल्हापूरला पाठवण्यात आला आहे. कोणत्याही पद्धतीची आरोग्याषी काळजी न घेता हा कचरा हलवण्यात आल्यामुळे सोलापूरकर आणि कोल्हापूरकर
या दोघांच्या आरोग्याला धोका निर्माण करण्याचे काम सदर कंपनीने केले आहे. ४) महानगरपालिकेला कुठलाही अधिकार नसतांना बायो मेडिकल वेस्टेज कोल्हापूरला घेऊन जाणेसाठी
संमती देण्यात आली. प्रदुषण खात्याची सुष्दा लेखी संमती नव्हती तरी सुध्दा बायोमेडिकल वेस्टेज कोल्हापूरला घेऊन जाण्यात आला. कोल्हापूरमध्ये बायोमेडिकल वेस्टेज वाहतूक करण्याचा परवाना असतांना एस.एस. सव्र्हिसेस ने सोलापूर मध्ये तसेच पत्र तयार करून शासनाधी व प्रशासनाची फसवणुक केलेली आहे. सदर एसा.एस. सर्व्हिसेसला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुठलीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सोलापूरकर आणि कोल्हापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचे काम एस. एस. सर्व्हिसेस करत आहे. याबाबत तत्कालीन आरोग्याधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी आयुक्तांसोबत झालेल्या मिनिटस् मिटींगमध्ये सुधारित वृत्तांत काढून बदल केले आहेत परंतु तसे करण्याचा अधिकार मंजिरी कुलकर्णी यांना नव्हता व नाही. भोगाव येथे जमिनीत पुरलेला बायोमेडिकल वेस्टेज हा कचरा ५० ते ६० टन असून त्यामुळे आजूबाजूच्या जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटरचा परिसर प्रदुषित झालेला आहे. याबाबत पुरावे देऊन सुध्दा मंजिरी कुलकर्णी यांनी कारवाई केलेली नाही. मंजिरी कुलकर्णी या बी.ए.एम.एस. असून सोलापूरकरांच्या डोक्यावर त्यांना आणून बसवले व सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम त्यांनी केले. सोलापूर शहरात एवढे मोठे स्पेशालिस्ट फिजिशियन एमडी तज्ञ डॉक्टर असून त्यांना एक बी.ए.एम.एस. व्यक्ती के काय आदेश काढते? हा खरा प्रश्न आहे. सदर बाबत टेंडर काढतांना प्रत्येक बेड साठी ९ रूपये दर ठरवून दिलेले असतांना ८ रूपये दर कसे काय काढण्यात आले हे समजण्यापलिकडचे आहे. तसेच या प्रकल्पाशेजारी असलेले मनपाचे स्मार्ट सिटीचे जे पाईप होते ते या एस. एस. सर्व्हिसेस मुळेच जळून खाक झाले आहेत. वेळोवेळी प्रदूषण अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी यांना निवेदने
देऊन सुध्दा कारवाई होत नसल्याने यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचे सिध्द होत आहे. ५) याबाबत प्रहार संघटनेने भोगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून मोठे आंदोलन केल्यानंतर महापालिकेच्या तात्कालीन आरोग्याधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले होते. परंतु लेखी पत्र
देण्याखेरीज काहीच कारवाई झालेली नाही. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निखील सोरे यांनाही निवेदन देण्यात आले होते, परंतु स्यांनीही या बाबीकडे कानाडोळा करीत काहीच कारवाई केलेली नाही. जिल्हाधिकारी यांनाही याबावत प्रहारच्या वतीने कारवाई करणेकामी निवेदन दिले होते, जिल्हाधिकारी यांनी याबाबत बैठक घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन हवेतप चिरले आहे. आता सध्याचे सो.म.पा. आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनीही सदर जागेवर जाऊन पाहणी केली असता तेथे शेकडो टन जैव
वैद्यकीय कचरा आढळून आलेला आहे. आता ते तरी कारवाई करतील काय हा खरा प्रश्न आहे. याबाबतचे सर्व फोटो , व्हिडिओ, दैनिकामध्ये आलेल्या बातम्या याची कात्रणे आमच्याकडे उपलब्ध आहेत, या प्रकल्पाची तातडीने उद्यस्तरीय चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करावी तसेच जे अधिकारी या प्रकल्पाला
पाठीशी घालत आहे त्यांची ही चौकशी तातडीने व्हावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी व डॉ. संदीप आडके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.