सत्ता जोपर्यंत तो पर्यंत शिंदेकडे गर्दी – जयंत पाटील

भाजपचा सर्वात मोठा प्रश्न अलीकडे हा झाला आहे की, आमचे अनेक सहकारी राष्ट्रवादीतून भाजपकडे गेले आहेत. त्यांना कुठे बसवायचे. निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे बसवायचे, हा यक्षप्रश्न आहे. मुळात हा त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गेलेले अनेक लोक असोत किंवा आता नव्याने शिंदे गटातून गेलेले लोक. या सर्व प्रकारात भाजपचे निष्ठावंत मागे ढकलेले गेलेले आहे. ती अस्वस्थता भाजपमध्ये मोठी आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पंकजा मुंडे यांनी भाजपमधील जी नाराजी व्यक्त केली. त्यावर पाटील यांनी वक्तव्य केले.
अहिल्यादेवींचं नाव अहमदनगरला देणं समर्थनीय
अहमदनगरला अहिल्यादेवींच नाव देण्याचा निर्णय समर्थनीय आहे. त्याला कोणाचा विरोध असण्याचे काम नाही. असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले. ते सोलापूरात पत्रकारांशी संवाद साधत होते. त्याचबरोबर त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. राष्ट्रवादीला लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळेल, यासाठी पक्ष त्या दृष्टीने काम करत असल्याचे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.
शिंदेची सत्ता आहे, तोपर्यंतच पक्षप्रवेश…
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात मोठ्याप्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. गृहपक्षांना राजीनामा देऊन मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. यावरून आज जयंत पाटलांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी दिली. शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. त्यांनी आताच अर्धातासापूर्वी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत.
शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितलं की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या म्हटलं, असं म्हणत जयंत पाटील मिश्किल हसले.
अमोल कोल्हे उत्तम उमेदवार
कोल्हे निवडणूक लढवणार नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, शिरूर मतदार संघात आमचे अमोल कोल्हे हे उत्तम उमेदवार आहेत. त्यांची संसदीय कारकीर्द चांगली आहे. बैलगाडा संदर्भातील संसदेतील भाषण असोत त्यांनी उत्तम प्रकारे काम केले आहे. अनेक मुद्द्यावर त्यांनी हात घातला आहे. त्यामुळे कोल्हे हे आगामी निवडणूकीसाठी इच्छूक नाही, या चर्चांना काही अर्थ नाही.
निवडणूक लागेल तेव्हा इच्छुकांची माहिती घेऊ
जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा आम्ही विविध ठिकाणी इच्छुकांची माहिती घेऊ. त्यामुळे आत्ताच त्यावर चर्चा करण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.
कर्नाटकाला पाणी दिले पाहिजे
कर्नाटकात एप्रिल-मे मध्ये दुष्काळ जन्य परिस्थिती असते. उजनीच्या धरणातील पाणी दिले जावे, अशी चर्चा आहे. महाराष्ट्राने कर्नाटकाला पिण्याचे पाणी द्यावे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने अभ्यास करून निर्णय घ्यावा.
पुण्याची जागा चर्चेतून सुटेल
ठाकरे गट कॉग्रेसची चर्चा करून पुणे लोकसभेच्या पोट निवडणुकीच्या जागेचा प्रश्न सोडवला जाईल. राष्ट्रवादीकडून अनेक जण इच्छूक जरी असले तरी त्यावर चर्चेतून मार्ग काढला जाईल. असे मत पाटील यांनी मांडले.