सोलापूर – जन्मदात्या आईनेच केलं मुलाचा खू-न

दारु पिऊन त्रास देणाऱ्याचा काटा काढण्यासाठी स्वतः जन्मदात्री आणि बहिणीने सुपारी देऊन खून रक्ताचा नात्याचाच खून केला. खुनानंतर मृतदेह टेंभुर्णी शहराजवळ टाकण्यात आला. या गुंतागुंतीच्या घटनेचा तपास सीसीटीव्ही फ टेज, टोलनाके, नातेवाईकांच्या आधारे उघडकीस आणून टेंभुर्णी पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणातील पाच जणांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ही घटना २५ मे रोजी घडली होती.
सोलापुर – पुणे महामार्गावर लक्ष्मी पॅलेससमोरील कुबेर वाळासाहेब पाटील यांच्या चव्हाणवाडी शिवारात अनोळखी ३० ते ३५ वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोहेका विशाल विजय शिंदे यांनी फिर्याद फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सपोनि गिरीश नोग, कुलदीप सोनटके, अजित मोरे यांनी तपासाची चक्रे फिरवली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे १५ हजार कारची तपासणी केली. यासाठी त्यांनी वरवडे, इंदापूर टोल नाक्यावरील सीसीटीव्हीचा आधार घेतला. त्यात संशयित कार सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील टोल नाक्यावरून २६ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काचेला टॉवल व मागील बाजूला कापड लावून जाताना आढळून आली. याबाबत संशय बळावल्याने कारच्या मालकाचा शोध घेतला असता तो तेलंगणा येथील आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार मालकाचा शोध घेतला. त्याच दरम्यान मयताचे फिंगर प्रिंटवरुन त्याची ओळख पटली आणि तो सुकुमार व्यंकटरामणा गोडोचेरला (रा. सदाशिवपेठ, मेडक, तेलंगणा) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मयताच्या नातेवाईकांना शोधणे सोपे झाले. मयताची आई अन्नपूर्णा व्यंकटरामणा तोराडी, बहिण विजयाकरूणा राजेंद्र चैधरी,थोरला भाऊ जीवनप्रसाद व्यंकटराम णा चैधरी, मेव्हणा राजेंद्र लिंगय्या चैधरी यांचे जबाब नोंदविले. त्यांनी काहीच संशय व्यक्त केला नाही. मयत सुकुमार हा आई अन्नपूर्णा व बहिण विजयाकरूणा यांच्याकडे शेरलिंगमपल्ली (जि. रंगारेड्डी) येथे राहत होता. त्यांना दारू पिऊन मारहाण करणे व इतर कारणावरून त्रास देत होता. मयत हा मागील दोन महिन्यांपासून घरी येत नसल्याचे आई आणि बहिणीने सांगितले होते. पोलिसांनी एवढ्यावरच समाधान न मानता पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व डीबी पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व त्यांच्या पथकाला संशय बळावल्याने त्यांनी तपास गतिमान केला. त्यात शेजाऱ्यांकडून मयत सुकुमार हा २५ मे रोजी राहत्या
घरी आल्याचे कळले. त्या आधारावर पोलिसांनी सुकुमारची आई व बहिणीला विश्वासात घेऊ चौकशी केली असता त्यांनी त्रास देत असल्याने गल्लीतील महम्मद अकबर खान यास जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारावर मुख्य आरोपी महंम्मद अकबर खान याची शोध मोहीम सुरु झाली. तो मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्यासह पथकाने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले. आरोपी महंम्मद अकबर खान याने गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रम सांगितला. मयताची आई अन्नपूर्णा व्यंकटरामणा तोराडी उर्फ गोड्डुचेरला (वय ६०) व बहिण विनयाकरूणा राजेंद्र चैधरी (वय४०) यांच्यासमक्ष मयतास नोकरी लावतो, म्हणून त्यास कारमध्ये बसविले. त्यावेळी मुख्य आरोपी महंमद अकबार खान यांच्यासोबत मुनीर अली शब्बीर अली सय्यद (वय ३७), महिबूब वलिद अब्दुल (वय ३५, रा. शेरलिंगमपल्ली, जि. रंगारेड्री, रा. तेलंगणा) हे होते. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितीम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय
जगताप यांच्या मार्गदशांनाखाली
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे, पोहेकों विलास नलवडे, संदीप गिरमकर, प्रदीप पर्वते, विनोद साठे, तुकाराम माने-देशमुख, पूनम शिंदे, पूनम देवकर, मनिषा मंठोळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सुबोध जम दाडे, कांबळे, सूरज निंबाळकर, एएसआय शिवाजी घोळवे, प्रकाश कारटकर, आतार फिंगर प्रिंट तज्ज्ञ सपोनि जालीवर गळवे, सागर मठपती, गुटाळ, सायबर सेलचे पोलीस नाईक व्यंकटेश मोरे यांनी बजावली.