‘राज्यपालांना सांगतो अधिवेशन बोलवा, अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा’, उद्धव ठाकरे यांचं चॅलेंज

‘पुरावा पुरावा की गाडावा?’
“गेल्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला… नाही लवादाने. लबाडाने नाही लवादाने दिला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा जनता आहे. त्यामुळे त्या न्यायालयात आम्ही आलो. देशात मतदार सरकार ठरवत असतो. कदाचित जगात आपला एकमेव किंवा कमी देश आहे ज्यांनी जनतेच्या चरणी संविधान अर्पण केलं आहे. सरकार कुणाचंही असलं तर जनता सर्वोच्च असली पाहिजे. हा सूर्य हा जयद्रथ. आता तरी निकाल मिळावा. न्याय मिळाला पाहिजे. पुरावा पुरावा की गाडावा?”, असा सवाल ठाकरेंनी केला.
“माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावं. पोलीस प्रोटोक्शन घ्यायचं नाही. मीही एक पोलीस घेणार नाही. तिथे नार्वेकर यांनी सांगावं शिवसेना कुणाची. मग जनतेने सांगावं कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा. माझ्यात हिंमत आहे. माझी तयारी आहे. शिवसेना तुम्ही विकली असाल ती काही विकावू वस्तू नाही. आज इथे शिवसैनिक आहेत. आज लाखो शिवसैनिक माझ्यासोबत कसे?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.