सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर अपघातसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापूरच्या प्रश्नावर दिलेल्या निवेदनाची नक्कीच दखल घेऊ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला वैभव गंगणे यांना शब्द…

सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी या दौरादरम्यान शासकीय विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शुभेच्छा देऊन सोलापूरच्या प्रश्नांवर महत्त्वाची निवेदन देण्यात आले. निवेदनात देण्यात आलेल्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे   

{१}सोलापूर मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याला कारणीभूत येथील जडवाहतुक आहे . ट्रॅफिक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे सोलापूरकरांरचा जीव धोक्यात आला आहे . विविध वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त प्रसारित केले आहे.सातत्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आवाज उठवत आहोत . नुकतीच सोलापुरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली ७ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा जड वाहतुकीमुळे मृत्यू झाला . याला जबाबदार येथील निष्फल वाहतूक यंत्रणा आहे त्यामुळे बाह्य वळण चा ५४ मीटर रस्ता होणे काळजी गरज आहे.आपण वैयक्तीक या प्रकरणात स्वतः लक्ष घालून शहरात जड वाहतुकीस परवानगी नाकारावी व सोलापूर च्या वाहतूक पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्यात.

{२}त्याचसोबत गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना समितीची नियुक्ती करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे .पालकमंत्र्यांच्या नियुक्ती साठी हा विषय प्रलंबित होता .आता सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा पदभार आपण स्वीकारल्याने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा . समित्या नियुक्ती नंतर संजय गांधी निराधार योजनेचे कामकाज पूर्ववत होईल .

 

{३}तसेच राज्याचे ग्राम विकास खात्याचे मंत्री ही आपण स्वतः आहात सोलापुरात दीड लाखाहून अधिक बेघर आहेत . त्यांच्या घरकुलांचा प्रश्नही प्रलंबित आहे .त्यामुळे आपण वैयक्तीक यात लक्ष घालून हा प्रश्न ही तातडीने मार्गी लावाल आणि सोलापूरच्या विकासासाठी आपण नेहमी तत्पर असाल अशी अपेक्षा आहे….

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel