महाराष्ट्र
सोलापूर मनपा आयुक्त लक्ष देणार का, भीमाशंकर नगर येथील नागरिकांची हाक…

तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मजरेवाडी परिसरातील भीमाशंकर नगर येथे अमृत योजनेच्या माध्यमातून ड्रेनेज चे काम झाले ते सुद्धा निष्क्रिय पद्धतीने झाले आहे. तसेच संबंधित अमृत योजनेच्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी लक्ष नाही.मागील अनेक दिवसापासून गटारीचे घाण पाणी चक्क रस्त्यावरून वाहत असल्याने येथील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. तसेच परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे, संबंधित घटने संदर्भात सोलापूर महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी, झोन क्रमांक चार, तसेच ड्रेनेज संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा येथील समस्या दूर होत नसल्याने येथील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त लक्ष केंद्रीत करून आमची समस्या सोडवून देतील अशी आशा येथील नागरिकांना लागली आहे पहा…