महाराष्ट्र

बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा होणार – अब्दुल सत्तार

राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता अशा बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. आगामी अधिवेशनात या संदर्भातला कायदा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

बोगस बियाणामुळे दुपार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. त्यामुळे या संदर्भात कायदा करण्याची किंवा कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. आता या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून आगामी अधिवेशनात ज्यांच्याकडे बोगस बियाणे, औषधे किंवा खते असतील त्यांनी ते तात्काळ नष्ट करावी. बोगस बियाणे विकणाऱ्यांना किमान दहा वर्षे शिक्षा होईल, असा कायदा करणार असल्याचा अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या बांधावर अडचणी समजून घेतल्या

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने अनेक प्रयत्न आणि उपाय केले असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित आम्ही खरीप हंगामाची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे काम राज्य सरकारने केला असल्याचा दावा त्यांनी केला. जे अधिकारी आणि कर्मचारी पैसे मागतात अशा ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, असेही सत्तार यांनी सांगितले.

दोन महिन्यांसाठी विशेष पथक

सध्या मी कृषिमंत्री आहे, आणि कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जर त्यांच्यासाठी काहीच केलं नाही तर शेतकरी मला कधीच माफ करणार नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. पोलिस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचे मिळून दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करणार अशी आपली कल्पना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव आपण राज्यपालांकडे घेऊन जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel