नई जिंदगीत सत्तेचा गैरवापर आम्ही खपून घेणार नाही – तौफिक शेख

याबाबत अधिक माहिती अशी की आज नई जिंदगी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवेदन सादर केले असून सदरील निवेदनामध्ये असे नमूद आहे की आम्ही नई जिंदगी परिसरातील 25 ते 30 वर्षापासून रहिवासी असून काही वृत्तपत्राच्या माध्यमातून व काही चॅनलच्या माध्यमातून व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील नई जिंदगी भागातील अतिक्रमणाबाबत दूरविचारणी बातमी दिल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सदरील निवेदनाद्वारे आपणास विनंती आहे की भारतीय विमानतळ प्राधिकरण यांचे नावे 1953 साली या भागातील किती जमीन संपादन झालेला आहे तसेच याचे गट किती व कोणता याची माहिती मिळावे व तसेच प्रशासनाच्या वतीने ती प्रसिद्ध ही करावे असे आशाचे निवेदन देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक तोफिक शेख पैलवान, समाजसेवक रफिक इनामदार, समाजसेवक निरोदिन मुल्ला, अश्फाक शेख, आसिफ राजे, यांसह नई जिंदगी परिसरातील बहुतांश नागरिकांची उपस्थिती होती दरम्यान या संदर्भात अधिक माहिती माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान, व समाजसेवक निरोदिन मुल्ला यांनी प्रसार माध्यमांना दिले…



