त्यांची आमच्यासोबत बसण्याची औकात नाही’, आपसात भिडाभीड, INDIA आघाडी तुटणार का ?

आम्ही 2021 मध्ये भाजपाला हरवलं. सीपीआय (एम) आणि काँग्रेसला शुन्य जागा मिळाल्या. त्यांनी भाजपाच्या फायद्यासाठी मतविभाजन केलं. जागा वाटपासंबंधी ममता बॅनर्जी अंतिम निर्णय घेतील. इथे कुठला लेफ्ट पक्ष नाहीय” “लेफ्टच्या लोकांची टीएमसीसोबत बसण्याची औकात नाहीय” असं कृणाल घोष एएनआयशी बोलताना म्हणाले.
इंडिया आघाडीतच एक वाक्यता नाही
शुक्रवारी दिल्लीत जेडीयूची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची सर्वसम्मतीने जनता दल यूनायटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव रंजन (ललन) सिंह यांच्या राजीनाम्यानंतर सीएम नितीश कुमार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. जेडीयूचे काही सदस्य कॉन्स्टिट्यूशन क्लब बाहेर घोषणाबाजी करत होते, ‘देशाचा पंतप्रधान नितीश कुमार यांच्यासारखा असावा’ नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच नेतृत्व कराव अशी जेडीयू नेत्यांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी सार्वजनिक ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संभाव्य पीएम उमेदवार म्हणून घोषित केलय. त्यामुळे इंडिया आघाडीतच एक वाक्यता नसल्याच दिसतय.