जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोनिया गांधी, राहुल गांधी यांना सूडबुद्धीने त्रास देत आहेत:- चेतन भाऊ नरोटे…

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवित असल्यामुळे सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांना सूडबुद्धीने त्रास देत आहेत : चेतन भाऊ नरोटे

सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्यासह कॉंग्रेस नेत्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या विरोधात सोलापूर शहर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक

देशाला सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी परिवाराला अडचणीत आणण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा मनमानी प्रमाणे वापर करून सूडबुद्धीने करत असलेल्या कारवाई विरोधात सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोदी सरकारच्या विरोधात मोदी सरकार डरती है-ईडी को आगे करती है, मोदी ‘तेरी हिटलरशाही नही चलेगी नहीं चलेगी, ईडी व तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा, मोदी सरकारचा धिक्कार असो, राहुलजी गांधी तुम संघर्ष करो- हम तुम्हारे साथ है, अश्या जोरजोरात घोषणा दिल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेला.

यावेळी चेतन भाऊ नरोटे बोलताना म्हणाले की, ज्या गांधी परीवाराने सर्वस्व त्याग करून देशासाठी बलिदान दिले अश्या परिवारातील काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाची व राहुलजी यांना २०१५ साली ईडीने बंद केलेली फाईल मोदी सरकारने धूर्त हेतूने पुन्हा उघडून नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने खोटा गुन्हा दाखल करून चार्जशीट दाखल करून नाहक त्रास दिला जात आहे. गेले अनेक दिवस सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांची चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे. आज जवळपास बारा वर्षे या प्रकरणाची चौकशीचे नाटक सुरू आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता मोदी सरकारची ही दडपशाही सहन करणारा नाही त्याविरोधात आजचे निदर्शने आंदोलन आहे. ईडी खरोखरच काम करत असेल तर किरीट सोमय्यानी व भाजपवाल्यानी अनेक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भाजप मध्ये गेल्यानंतर एकाचीही ईडी चौकशी करत नाही. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना भाजपच्या साबणाने स्वच्छ धुवून भाजपमध्ये सामील करून घेतले. मोदींनी अजित पवार यांच्यावर हजारो कोटीचा भ्रष्टाचार आरोप केला होता त्याच्या तीन दिवसातच त्यांना सत्तेत सामील करून घेतले. भाजप देशभरात भाजपचे हजारो कोटींचे ऑफिस निर्माण केले त्यासाठी कुठून आला पैसा, PM केअर व राफेलच्या दलाली, इलेक्ट्रॉल बाँड मध्ये मोदींनी किती पैसे किंबहुना दलाली खाल्ली याचीही ईडीने चौकशी करावी. अदानी, अंबानी आणि इतर व्यावसायिकांचे १२ लाख कोटी बँक कर्ज माफ केले त्याचा हिशोब कोण देणार ? भाजपचा प्रचंड भ्रष्टाचार लपविण्यासाठी काँग्रेसला टार्गेट केलं जातं आहे. राहुलजी गांधी देशभरात मोदी सरकारच्या आणि भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध, रान पेटविण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मा. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी व इतर कॉंग्रेस नेत्यांना ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, च्या चौकशीत गुंतवून ठेवल्यास गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तू वरील अनावश्यक जीएसटी, खालावणारी देशाची आर्थिक स्थिती, जागतिक बाजारात रुपयाचे अवमूल्यन, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, सरकारी मालमत्ता विकणे, यासारख्या गंभीर मुद्द्यावर आंदोलन करण्याची हिंमत करणार नाहीत असे मोदी सरकारला वाटते आणि अश्या मूळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवायचे. तसेच आगामी काळात गुजरात, बिहार, आसामच्या काळात निवडणुका आहेत. कॉंग्रेस नेत्यांवर कारवाई करून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या ब्रिटिशांना काँग्रेस कार्यकर्ते घाबरले नाही त्यांना देशातून हाकलून लावले ते काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोदी सरकारला काय घाबरणार. मोदी सरकारच्या या दडपशाहीला सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी पुरून उरतील मोदी सरकारसमोर कदापी झुकणार नाहीत.

या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मा. नगरसेविका श्रीदेवी फुलारे, म. प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोलू, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, दत्तू बंदपट्टे, NK क्षीरसागर, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, भोजराज पवार, रमेश हसापुरे, हारून शेख, सागर उबाळे, भीमराव शिंदे, अनिल मस्के, रामसिंग आंबेवाले, लक्ष्मीकांत साका, भारती ईप्पलपल्ली, सुमन जाधव, करीमुनीसा बागवान, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, मुमताज शेख, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, हाजीमलंग नदाफ, परशुराम सतारेवाले, नूर अहमद नालवार, विवेक इंगळे, संजय कुऱ्हाडे, दाऊद नदाफ, धीरज खंदारे, रमेश कोळी, शिवाजी साळुंखे, बालाजी जाधव, वशिष्ठ सोनकांबळे, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, मुमताज तांबोळी, लता सोनकांबळे, चंदा काळे, मोहसीन फुलारी, महेंद्र शिंदे, प्रमिला हमाम, सायली पठाण, तौसिफ शेख, शुभांगी लिंगराज, रफिक रामपूरे, सुनंदा साबळे, महादेव येरनाळ, नागेश म्हेत्रे, आकाश वाघमारे, सचिन सुरवसे, शशिकांत जाधव, अकबर शेख, अभिलाष अच्युगटला, सानिया शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel