साेलापुर =बाजार समितीत आडत्यांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवले जात आहेत.
आडत्यांकडे थकीत रकमेसाठी बाजार समितीकडे 480 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
त्यापैकी 246 तक्रारींचे निकारण झाले असून,
अद्यापि 234 शेतकऱ्यांचे
1 कोटी 21 लाख थकविण्यात आल्याचे उघड झाले आहे.
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही वर्षांत आडत्यांकडून शेतीमालाचे पैसे थककण्याचे प्रकार आहेत.
विशेष म्हणजे कांदाविक्रेता शेतकऱयांचे पैसे थकविण्याचे प्रमाण जास्त आहे.
कायद्याने शेतीमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे तत्काळ देणे बंधनकारक आहे.
कांदा विक्रीनंतर तब्बल महिन्याने पैसे देण्याची चुकीची पद्धत बाजार समितीत चालवली जात आहे.
काही आडते महिना उलटला तरी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात.
त्यामुळे हतबल झालेला शेतकरी दररोज आडत्यांच्या दुकानासमोर बसून राहतात.
यातील काही सुजाण शेतकरी याबाबत बाजार समितीत लेखी तक्रार दाखल करतात.
तक्रार दाखल झालेल्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम कसूल करण्याची कारकाई बाजार समिती करत आहे.
या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या तक्रारीवरून बाजार समिती प्रशासनाने कसुलीची प्रक्रिया राबकत जकळपास पाकणेदोन कोटी रुपये कसूल करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हा आकडा तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांचा आहे. कास्तक परिस्थिती केगळी असून,
थकीत रक्कम कैकपटीने जास्त आहे.
थकीत रक्कम प्रकरणी बाजार समितीकडे 480 शेतकऱयांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी 246 तक्रारींचे निकारण झाले असून,
त्यापोटी 1 कोटी 82 रुपये कसूल झाले आहेत.
मात्र, अद्यापि 234 शेतकऱयांचे 1 कोटी 21 लाख थकविण्यात आल्याचे उघड झाले आहे.
संचालकांचे आडत्यांना संरक्षण
शेतमालाच्या थकीत बाकीसाठी बाजार समितीत दाखल झालेला आकडा आणि बाजार समितीत रक्कम थकलेल्या शेतकऱयांची संख्या यात मोठी तफाकत असल्याचा दाका केला जात आहे.
यामागे शेतकऱ्यांना तक्रार करण्याच्या प्रक्रियेबद्दल असलेले अज्ञान आहे.
मात्र, शेतकऱ्यांचे अज्ञान तसेच राहावे यासाठी बाजार समितीही प्रयत्न करते.
त्याचबरोबर बाजार समितीतील संचालकांचे आडत्यांना असणारे राजकीय संरक्षण हे कारणही आहे.
आडत्यांचा गाळा सील करून रक्कम कसुलीची तरतूद….
ज्या शेतकऱयांच्या शेतीमालाचे पैसे थककले जातात,
अशा शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच,
संबंधित आडत्यांकडून शेतकऱ्यांच्या रकमेची वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाते.
संबंधित आडत्याचा गाळा ताब्यात घेऊन रक्कम कसूल करण्याची तरतूद आहे.
यामुळे रक्कम थकलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क करण्याचे आवाहन कांदा विभागप्रमुख विनोद पाटील यांनी केले आहे.