भाजपला कुणीही सत्तेतून बेदखल करू शकणार नाही – देवेंद्र फडणवीस

आगामी सार्वत्रिक निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा विजय झाला तर सत्ताधारी भाजपला कुणीही सत्तेतून बेदखल करू शकणार नाही, असा वा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मोदींच्या नेतृत्वात पुढील 5 वर्षांत भारताचा मोठा विकास होणार आहे. कार्यकर्त्यांनी 1 वर्षभर कष्ट घेतले आणि 2024 मध्ये मोदींचे पुन्हा सरकार आले तर त्यानंतर कुणीही भाजपला सत्तेतून बाजूला करू शकणार नाही, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हयात दौऱ्याची सुरूवात ही सावनेरमधून करा, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मला पालकमंत्रीपदाची तुम्ही मला शिकवण द्या असे बावनकुळेंना म्हटल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपचे मजबूत संघटन ते निर्माण करत आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात भाजपा नागपुरात मजबूत आहे. तितकीच मजबूत ती सावनेर मतदारसंघात आहे. निवणुकीच्या वेळी काही तरी शाप लागतो आणि आपण निवडणुकीत मागे पडतो. सावनेर मतदारसंघात आपली चांगली ताकद आहे.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, सावनेरमध्ये कार्यकर्त्यापैकीच कुणाला तरी संधी मिळणार आहे. आम्ही नवीन काही प्रयोग सावनेरमध्ये करणार नाही. यावेळी आम्हाला सावनेरमध्ये विजय मिळवायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढविण्याची गरज आहे. येत्या 2 दिवसात 4 मतदारसंघात दौरा करणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 2024 मध्ये पुन्हा आपण ताकदीने सत्तेत येणार, 2019 मध्ये लोकांनी आपल्या पाठित खंजीर खुपसला होता, त्याचा बदला गनिमी काव्याने घेतल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापुढील 5 वर्षांत मोदी यांच्यामुळे भारत देशाचा मोठा विकास होणार असून कार्यकर्त्यांनी जर 1 वर्षभर मेहनत घेतली तर 2024 ला मोदी यांचे सरकार आले तर त्यानंतर कुणीही भाजपला सत्तेतून बाजूला करू शकणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
फडणवीसांचा नागपुरात दौरा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. ते आपल्या या दौऱ्यामध्ये सावनेर आणि काटोल विधानसभा मतदार संघाला भेट देऊन आढावा घेणार आहेत. या दौऱ्यामध्ये फडणवीस दोनही मतदारसंघात बैठका आणि सभा देखील घेणार आहेत. सावनेर हा काँग्रेसचा तर काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सावनेर हा काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांचा मतदारसंघ आहे. तर काटोल हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे.