शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने म. न.पा.च्या निष्क्रिय कामकाज विरुद्ध – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापुरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले भरून जाणे, ड्रेनेज भरून जाणे, खड्ड्यामुळे पाणी भरून डासाचे प्रमाण वाढणे, पाणीपुरवठा अनियमित व अवेळी होणे, अशा प्रकारामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येऊन, जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनास अनेक वेळा निवेदने देण्यात आले. आणि आंदोलने ही करण्यात आले. परंतु म.न.पा प्रशासन कुठलेही दखल घेत नाही. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी तथा प्रभारी म.न.पा आयुक्त सोलापूर यांना दिनांक २/७/२९२४ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने
उपजिल्हाप्रमुख :- प्रताप चव्हाण व महानगरप्रमुख :- विष्णु कारमपुरी (महाराज) नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील नागरीकांना महानगरपालिकेकडून नागरी सुविधा पुरविण्यात येत नाहीत. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विविध कामे नित्कृष्ठ दर्जाचे करून कोट्यावधीची बिले संबंधीतांनी संगनमत करून उचलली आहेत. आज शहराच्या विविध भागात कचरा व अस्वच्छता दिसून येत असताना देखील, मक्तेदारास कोट्यावधीची बिले अदा केली जात आहेत. या सर्व बाबीची चौकशी करून संबंधीतावर कडक कारवाई करण्यात यावी.
प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे गळती होवून पाणी रस्त्यावर येवून ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत, पाण्याचा अपव्यय होतो. याबाबत विभागीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांना ही परिस्थितीची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने व मनोरंजनासाठी विविध भागात उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे, या उद्यानाची देखभाल संबंधी पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे उद्यानात मोडके तोडके बाक, मोडकळीस आलेली खेळणी, कचरा, अस्तावस्त वाढलेले गवत, विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. अशा अनेक समस्या उद्यानविभागाच्या असून संबंधीत कर्मचारी, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
निराळे वस्ती ते अरविंद धाम या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या काही वर्षापुर्वी केले असताना ५-६ महिन्यापुर्वी हा रस्ता पाईपलाईनच्या कामासाठी पुर्णपणे खोदला गेला, काम पुर्ण झाले तरी रस्ता पुर्ववत करण्यात आला नाही. त्यामुळे नागरीकांना येणे जाणे कठीण होत आहे.
नागरीकांच्या सुरक्षीततेसाठी छत्रपति संभाजी महाराज पुतळा ते अरविंद धाम, रेल्वे पुल या रस्त्यावरील सर्व्हस रोड पुर्ण केल्याशिवाय वाहतुक सुरू करण्यात येवू नये.
नागरीकांचे आरोग्य पावसाळयात किटकजन्य आजारामुळे बाधीत होवू नये यासाठी विविध भागात फवारणी, धुरळणी करण्यात यावी. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन, कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी व नागरीकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी ही विनंती. असे नमूद करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रताप चव्हाण, विष्णु कारमपुरी (महाराज), बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, शिवा ढोकळे, बंटी बेळमकर, जरगिश मुल्ला, अण्णा गवळी, मिनाक्षी गवळी, वैशाली सातपुते, शुभम गवळी, संताजी भोळे, उज्वल दीक्षित,अनिल दंडगुळे, रेवण बुक्कानुरे, शशिकांत बिराजदार, बाळासाहेब पवार, सुभाष सातपुते, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.