महाराष्ट्र

लग्नसोहळ्याहून परतत असतानाच अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…

अमरावती येथे लग्नकार्य आटोपून येणाऱ्या एका वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलांचाही समावेश आहे.

वाहनाला भरधाव ट्रकने दिली धडक

अंजनगाव सुर्जी येथे नातेवाईकाकडे असलेले लग्नकार्य आटोपून दर्यापूरकडे येणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत वाहनातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. 22) रात्री उशिरा अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावरील इटकी फाट्याजवळ झाला आहे. अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अमरावतीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.

तिघांचा घटनास्थळीच मृत्यू

दर्यापूर येथील एकाच कुटुंबातील 12 जण लग्न कार्यासाठी अंजनगाव सूर्जी येथे गेले होते. लग्न कार्य (वलीमा) आटोपून ते दर्यापूरकडे परत येत असताना इटकी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनालाल जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान सर्व जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे दर्यापूरवरून नऊ जणांना अमरावती पाठविण्यात आले.

मृतक व जखमी सर्वजण एकाच कुटुंबातील

जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी एका अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दोघांना मृत घोषित केले. त्याचवेळी उर्वरित सहा जखमींवर सध्या शहरातील पीडीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळतात खल्लार पोलिसांसह ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतक व जखमी एकाच कुटुंबातील आहे. या घटनेमुळे दर्यापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel